नेहा सकाळी उठली
बाहेर.. आली तेव्हा दारात पत्र पडलेल मिळाल ..हलकेच तिने ते उचलल आणि वाचू
लागली, थोडी तबकली चुक माझीच म्हणत रडत खाली बसली..म्हणाली मीच केल फोर्स
अरूणला म्हणून पुन्हा त्याने सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतल. आणि दोन
महिन्यातच अशी कशी त्याची बेपत्ता होण्याची खबर आणि तीही पत्राने कळते..
म्हणजे आता अरुण पुन्हा कधीच दिसणार नाही का ... तिने स्वत ला सावराल आणि
काश्मीरला फोन केला.. पत्रात तर फक्त बेपत्ता झाल्याची बातमी पण आता तर
फोन वर त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून नेहा कोसळलीच श्वेता ला हाक मरलि..
म्हणाली तुझा अरुण दादा गेला ग. मला सोडून एकटीलच.. अन् धमासा धमसी रडायला
लागली...
..काही दिवस
गेले ....तीच एकटेपण तिला खायला उठल होत ....हे सगळ ती श्वेता बरोबर शेयर
करत असे...श्वेता लाही ते कळू लागल होत की नेहाचहि आयुष्य आहेच ... पण
त्या आयुष्यात आता अरुण ची जागा कोणीतरी घ्यायला हवी . मग कित्येक दिवस
नेहाने असेच अरुण च्या स्टडी रूम मध्ये बसून काढले अरुण च्या आवडीची पुस्तक
वाचण्यात तिचा वेळ जाऊ लगल.. असाच एक दिवस " रणांगण" पुस्तक वाचताना
तिला त्यात अरुण ने लिहिलेला एक कागद मिळाला..
अरुण.. "
नेहा
धावत होति. कारण तिला 7.20 च्या बस ने श्वेताला गाठायच होत. बस मध्ये
चढतच तिने सगळीकडे नजर फिरवली आणि श्वेता दिसल्यावर ती तिच्या बाजूला जाऊन
बसलि. तिला म्हणाली आज तुझी खूप आठवण येत होति. आणि रडायालाच लागलि...
म्हणाली हे बघ अरुण ने काय लिहून ठेवलय ते ...
श्वेता म्हणाली अग वहिनी तुला आता असा विचार करायलाच हव.. अरुण दा साठी नाहीतर माझ्या साठी आणि तुझ्यासाठी..
आज मात्र अगदी श्वेता च्या मनासारख नेहा ने केल होत आणि ...अर्थातच अरुण ची शेवटची इच्छा ही तिने पूर्ण केली होती..
"आज नेहाच
लग्न झाल...एक चांगल्या माणसा बरोबर..सुखात जगेल आता ती हो ना अरुण
दा?.... श्वेता रडत अरुण च्या फोटो समोर उभी राहून बोलत होती ..
ती
वळली अरुण च्या स्टडी रूम मध्ये गेलि...तिनेहि " रणांगण" पुस्तक काढल
त्यातून कागद बाहेर काढला आणि फाडून टाकला ... आणि म्हणाली मीच लिहिलेल्या
काही ओळिनी नेहा च्या आयुष्यातला एकटेपणा निघून गेला .. चांगल केल ना अरुण
दा मी..... ??
No comments:
Post a Comment