Sunday 17 May 2015

* मी त्याला 'एप्रिल फूल' बनवले * - April Fool Special Poem

प्रस्तावना : १ एप्रिल म्हणजे आपल्या प्रियजनांच्या खोड्या काढून त्यांना फसवून 'एप्रिल
फूल'बनवण्याचा हक्काचा दिवस.माझ्या 'नक्की कोण तू माझा'या कवितेच्या नायिकेला पडलेल्या
प्रश्नाचे उत्तर ती ह्याच 'एप्रिल फूल'चा आधार घेउन शोधायचे ठरवते.१ एप्रिल ला त्याला मनातले
खरे सांगून तो जर म्हंटला की आपण फक्त दोस्तच आहोत तर त्याला 'एप्रिल फूल'म्हणून ही
दोस्ती कायम ठेवावी पण जर त्याच्याही मनात प्रेम असेल तर सर्व प्रश्न मिटतील ह्या उद्देशाने
नायिका त्याला खरे सांगते..त्याच्यावर ही कविता..

 
** मी त्याला 'एप्रिल फूल' बनवले **

'नक्की कोण तू माझा' प्रश्नाचा मी निकाल लावायचे ठरवले,
निकालाचा दिवस 'एक एप्रिल' ला निवडले,
प्रेमपत्र त्याच्या हातात दिले,
नजर त्याची झाली कावरीबावरी,
वाटलं हिची लग्नपत्रिकाच..हातात पडली..

त्याच्या चेह-यावरचे भाव वाचत होते,
माझ्या उतराच्या मी जवळ जात होत्ते,
आनंदाने तो बोलला,माझ्या मनातले बोललीस,
तुला विचारायची इच्छा होती पण नकाराने,
दोस्ती तुटु नये हीच काळजी होती..

विचार केला, विमान याचे खाली आणूया,
म्हटले त्याला, अरे वेडया, 'एप्रिल फूल' केले तुला,
दोस्तीत आपल्या प्रेम बिम आणाच कशाला,
उसने हसु आणत कसाबसा बिचारा बोलला,
'जातो,उशीर झालाय'..म्हणत त्याने रस्ता धरला..

डोळे भरले होते त्याचे,मी ही काही क्रूर नव्हते,
धावत त्याला थांबवले,परत 'एप्रिल फूल' बोलले,
माझ्या डोळ्यांतले भाव त्याने ऒळखले,
'एक एप्रिल'ने मैत्रीत प्रेमाचे धागे गुंफले,
'नक्की कोण आम्ही एकमेकांचे' ह्या प्रश्नाचे उत्तर दिले..

जीवनाकडे पाहण्याचा सुंदर दृष्टीकोन - Nice Thought for Life

बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठी, तबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले. मुलगा म्हणाला, "वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो !'
वेगळं वाटलं. शहराला जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून तो आला. थकला होता. लगेच झोपायला गेला. मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला. त्याची झोपमोड झाली. बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. तबेल्यात घोड्यांसाठी गवत भरलेले नव्हते. पाणीही ठेवलेले नव्हते. त्याला काळजी वाटली. त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या. त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीत मालकाने रेनकोट चढवला; छत्री, विजेरी घेतली. माळावर गेला. सर्व गवत आवरून, त्याचे ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत तबेल्यात गेला. गव्हाणीत गवत, पाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन समाधानाने झोप घेत होते. त्याने कुतूहलाने पाहिले, वरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! निसर्गाचे एवढे तांडव बाहेर चालले होते, ते त्याच्या गावीही नव्हते.
नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला ताण नव्हता. का नव्हता? झोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामे व्यवस्थित पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत शिरायला फटच नव्हती!.

कुठलंही काम, प्रॉजेक्‍ट, कुठलीही कंपनी आणि कुठलाही अमेरिकन, युरोपियन क्‍लाएंट तुमच्या जिवापेक्षा मोठा नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल, झेपेल एवढंच काम हातात घ्या; त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम ऑफिसमधल्या कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं. ऑफिसमधले ताणतणाव, स्पर्धा, पक्षपात इ. इ. घरी घेऊन न येता, तिथंच विसरून या. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा.
तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचाच हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ.चा उपयोग करा. हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.


दोन तत्त्वं :

"एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका."
"दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात " :)

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

पिझ्झा ( जगण्याचा अन खर्च करण्याचा नवीन अर्थ )

पिझ्झा ( जगण्याचा अन खर्च करण्याचा नवीन अर्थ ) - Pizza Very Nice Story

तुला माझ्याबद्दल काय वाटत?? - अप्रतिम कथा ( Marathi Love Story )

लग्नाला बारा वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ... तुला माझ्याबद्दल काय वाटतं ? तो बावचळला ... गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... ! प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ... तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडे ही एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ... पण मग लग्न झालं ... संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली ... आणि काल परवा अचानक हा गुगली पडला ... त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती .. हातात लाटणं ... समोर तापलेला तवा ... त्यानं संभाव्य धोका ओळखला .. आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे .. संध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...' असं म्हणून तो कामावर सटकला ... ! तो घरातून बाहेर पडला खरा ... पण घर काही डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं .. ! अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला ... कठीण असतं हो ... नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं .. तो विचार करत होता .. काय सांगावं .. ? मी राजा .. तू माझी राणी वगैरे काही म्हणावं का ... नको .. फार फिल्मी वाटतं .. तू खूप छान आहेस ... असं म्हणावं ... नको ... तिला ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे .. समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ... तर ती नक्की म्हणेल ... राजकारण्यांसारखी उत्तरं देऊ नकोस ... त्याला काहीच सुचेना ... बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं ... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ... लाईन लागेल नवऱ्यांची ... त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते .. सूर्य मावळला ... घरी जायची वेळ झाली .. आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार ... याची त्याला खात्री होती ... घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता ... त्यानं बेल वाजवली .. अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही .. त्याच्या मुलानं दार उघडलं ... आणि पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला ... मुलगा जवळ जवळ उडी मारत म्हणाला ... भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय धुवून या ... तो मान डोलावून आत गेला ... आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ... बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली ... त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं ... तिनं तोंडभर हसून विचारलं .. काही सुचलं ... ?  


त्यानं नकारार्थी मान हलवली ... तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदानं म्हणाली ... मलाही नाही सुचलं ... ! तो पुन्हा गोंधळला ... इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया ... ? आणि ती बोलतच होती ... काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं ... तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ? सात दिवस विचार केला .. पण मला काही सांगताच येईना ... मग भीति वाटली ... माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. ? अपराधी वाटायला लागलं - काय करावं कळेना ... मला स्वतःविषयी शंका होती पण बारा वर्षानंतर ही तुझं प्रेम कणभर ही आटलेलं नाही याची खात्री होती. म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ... वाटलं .. तुला उत्तर देता आलं तर आपण 'Fault' मध्ये आहोत .. पण नाही ... तुलाही उत्तर देता आलं नाही ... म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत ... जिथे फक्त 'वाटणं' संपून 'वाटून घेणं' सुरु झालंय ... आता शब्द सापडत नाहीत ... आणि त्याची गरजही वाटत नाही ... कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड संपलीय ... असं म्हणून तिनं एक कांदा भजी. त्याला भरवली ... शपथ सांगतो ... त्याच्या बारा वर्षाच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता ..:)

एंक खूप छान कथा.....शेवंती



कायद्याने दोघे वेगळे
झाल्यावर त्याने
राहतं घर विकायला काढलं.
ब्रोकरच्या थ्रू तिच्या
वडिलानीच ते घर
विकत घेतलं......
पून्हा घराची
एक किल्ली
त्याच्या हातात
देत म्हणाले...
'मी माझ्या लेकीला
ओळखतो .....
तसा तुलाही.. ...
सगळ्या गोष्टी
भावनेच्या भरात करतोस...
अगदी माझ्या
लेकीशी लग्न सुद्धा......
पून्हा भावनेच्या भरात
एकत्र यावसं
वाटलं तर?
तसं व्हायला नको...
म्हणून
ही रिकामी वास्तू
तुझ्या हवाली
करतो......
कधी वाटलं तर
येऊन बसत जा.....
"भरल्या घरा पेक्षा
रिकामं घर जास्त
बोलतं आपल्याशी......"
भावनेपेक्षा विचार
जास्त ठाम असतात......
विचारांवर ठाम झालास
तर ......
घेतल्या निर्णयाचा
पश्चाताप होणार नाही.. ...
निर्णय ठाम झाला की
माझी किल्ली
मला परत दे. .....
नाहीतर येऊन
माझी मुलगी
परत घेऊन जा......'
आणि खरच तो
ढळत्या दुपारी
रिकाम्या घरात
बसायला लागला......
कलंडणारी ऊन्ह
आपल्या घरात
अशी ऐसपैस पसरतात
त्याला माहीतच नव्हतं... ...
मावळतीचा वारा
अख्ख्या घराचा
ताबा घेतो ..   ..
याची त्याला
कल्पनाच नव्हती...
एक चूकून राहिलेलं
'कालनिर्णय' होतं
भिंतीवर वार्‍याने
फडफडत होतं ....
त्या फडफडण्याचा
आवाज सुद्धा त्याला
नवा होता... ...
त्याने जवळ जाऊन
बघितलं ......
कसल्या कसल्या नोंदी
त्यावर तिने करून
ठेवल्या होत्या...
कसली बीलं
देण्याची तारीख,
दूधाचा हिशोब,
कामवालीचे खाडे,
पेस्ट कंट्रोलची
तारीख...
सिलेंडर संपल्याची तारीख,
ग्राहकचं सामान
येण्याची तारीख...
इस्त्रीचे कपडे
त्याचा हिशोब
या कशातच
तो सहभागी नव्हता... ..
अगदी तिच्या
महिन्याच्या तारखा...
तारीख पुढे गेलीतर....
त्याला गलबलूनच आलं ....
या कशा कशातच
आपण सहभागी नव्हतो.. ...
ती एकटीचा डाव
खेळत राहीली आणि
आपण फक्त.......
तक्रार करत राहिलो.....
त्याला त्या 'कालनिर्णय'
समोर उभं राहणं
शक्य होईना. .....
तो बेडरूम मधे आला
त्याने
खिडकी उघडली .....
खिडकीत तिने
हौसेनं लावलेली
शेवंती होती ......
वाळून वाळून
झूरायला आलेली ....
तिला भिजवयला
तो आतूर झाला,......
कातर झाला...
पाणी घालायला
भांड नव्हतं .......
त्याने कूंडीच
सींक मधे नेली
यथेच्छ पाणी शिंपडलं.....
तहानलेली शेवंती
गटा गटा पाणी प्यायली.. ....
आणि तोच तृप्त झाला......
तेवढ्यात लँच कीने
दार उघडल्याचा
आवाज आला .......
ती आली होती......
शेवंतीसारखीच... .....
तिला समोर बघून
तो उनमळून गेला... ...
काय अवस्था
करून घेतली
आहे हिने... ....
हिच्या आयुष्यातलं
आपलं स्थान
आपल्या लक्षात
कसं आलं नाही?... ....
की आपण लक्षात
घेतलं नाही?
जिद्दीला पेटून
भांडते तेंव्हा
ती कुठल्याही
टोकाला पोहोचते
हे काय आपल्याला
लग्नाआधी माहीत नव्हतं?.....
दोघांची नजरा नजर झाली...
दोघे क्षणभरासाठी स्तब्ध.....
ती म्हणाली,
"मी ही शेवंतीच
न्यायला आले
होते... "
तो गलबलून म्हणाला,
"आत्ताच पाणी दिलय... ...
तिचं निथळणं
संपेपर्यंत थांब ना......"
आणि ती थांबली......
..अगदी...   कायमची...!!! 


पाहताक्षणी एखादी
व्यक्ति आवडणं
हे 'आकर्षण'असतं.....
परत पहावसं वाटणं
हा 'मोह'असतो....
त्या व्यक्तिच्या
जवळून जाण्याची
इच्छा असणं
ही'ओढ'असते.....
त्या व्यक्तिला
जवळून जाणणं
हा 'अनुभव' असतो.....
आणि त्या व्यक्तिला
तिच्या गुणदोषांसह
स्विकारणं .......
हेच खरं "प्रेम" असतं.....
हेच खरं "प्रेम" असतं.....
नात्याची सुंदरता
एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे.....
कारण एकही
दोष नसलेल्या
माणसाचा
शोध घेत बसलात.......
तर आयुष्यभर
एकटे राहाल......
विश्वास उडाला
की आशा संपते......
आणि काळजी घेण
सोडल की प्रेम......
म्हणुन, विश्वास ठेवा,....
आणि काळजी घ्या.......
आयुष्य खुप सुन्दर आहे........
लेखक : चंद्रशेखर गोखले

मराठी उखाणे

सुंदर सुंदर उखाणे.......
"नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा ,
.........रावांचे नाव असते ओठावर पण प्रश्न असतो उखाण्यांचा !!"
"नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद ,
..........चे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद !"
"अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद न सदिच्छा ,
असेच सदैव मी व ...........च्या पाठीशी राहा हि मनीषा !"
"कळी हसली ,फुल उमलले,मोहरून आला सुगंध,
.........च्या सोबतीत मला गवसला जीवनाचा आनंद !"
"आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद ,
.........चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद!"
"एका वर्षात महिने असतात बारा,
......... या नावात सामावलाय आनंद सारा!"

"दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
.........चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी!"
"आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
...........चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा!"

Tuesday 7 April 2015

“Star Plus”

Shadi k bad agr Larki ko Susral
Wale bure lagne lagen
tou Samaj Lo K,
.
.
.
.
.
.
“Star Plus” works. 




Sawal: Patni maike jakar pati ko
roj phone kyun krti h?
Jawab: Taki pati ko yad rahein
musibat tali nhi 

मोकळा श्वास घेऊ दे...

"मागणं जास्त
काही नाही समाजाकडे,सन्मान ाने
मला मोकळा श्वास घेऊ दे...
नारी मी ही तुमच्यातली आहे
ना एक,अभिमानाने मला ही इथे
आता जगू दे..." 


मुलीनो तुमच्यासाठी खास.......
Complecated असल्या तरी,,,
आपल्या जीवनाचा भाग असतात
या मुली...
बापाच्या हृदयाची धड धड असतात
या मुली.....
आईच्या जवळच्या मैत्रिणी असतात
या मुली........... ..
भावाच्या हातातली राखी असतात
या मुली...........
...
नवर्याला आधार देणाऱ्या असतात
या मुली........... ...
मायेच झाड असतात मुली..........
प्रेमाच पांघरून असतात मुली........
जिव्हाळ्याच्या सोबतीही असतात
मुली........... ..
कितीही complecated
असल्या तरी............
आपल्या जीवनाचा भाग असतात
या मुली...........

सच्चा गुरु

नौजवानयुवक रहता था। इक दूध बेचनेवाली दोनों को रोज़ दूध देनेआया करती थी। साधू सारा दिनहाथ में माला लेकर प्रभु नामका जाप किया करता। साधू को अचरजहुआ देख कर कि दूध बेचनेवाली जब उसको दूध देती तो मापतोल कर लेकिन उस नवयुवक केबर्तन में बिना माप तोल कियेही डाल दिया करती है। एक दिनसाधू ने पूछ ही लिया कि आपउसका हिसाब किस तरहरखती हो , आपतो कभी देखती ही नहीं कि कितना डाला नवयुवकके बर्तन मेंआपने। दूध बेचने वाली का जवाबथा कि मैं उसको प्यारकरती हूं ,उसके साथ कमज़्यादा का हिसाब कैसे रखसकती हूं।उससे बदले में लेना नहीं मुझेकुछ भी। साधू को लगा कि एक दूधबेचनेवाली जिसको प्यार करती हैउसका कोई हिसाबनहीं रखती और मैं हूं कि जिसपरमात्मा से प्यार करने की बातकहता हूं उसके नामकी माला गिनता रहता हूं। और उससाधू नेमाला को फैंक दिया औरकहा कि माई आपने मुझेसच्चा प्यारक्या है ये सबक सिखलाया हैमैं आपको अपना गुरुमानता हूं। 


Anshi World

ती पण मी पण

भेटत ती पण नाही,
भेटत मी पण नाही....
निभवणे तिला जमत नाही,
आशेवर ठेवण मला पटत नाही.
फसवत ती पण नाही,
फसवत मी पण नाही....
तिला रुसण्याचे दु:ख आहे,
मला एकटेपणाची भीती आहे....
समजत ती पण नाही,
रागवत मी पण नाही......
कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी
बघत ती पण नाही,
थांबत मी पण नाही....
जेव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी बोलेन तिच्याशी....
ऐकत ती पण नाही,
सांगत मी पण नाही....
पण एक गोष्ट मात्र खरी आहे,
प्रेम माझे आजही आहे तिच्यावर
नाकारत ती पण नाही,
सांगत मी पण नाही... 

प्रेमाचे बारा महिने ...!

प्रेमाचे बारा महिने ...!
जानेवारीत तिला पाहिलं
आणि प्रेम करावसं वाटलं
फेब्रुवारीत " ती " दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ
लोटलं
मार्च मध्ये " ती " माझ्याकडे पाहुन गोड हसली
एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली , म्हणजे फसली...!
मे मध्ये मी तिच्याकडे
ओढले गेलो
जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो..
जुलै मध्ये आम्ही पावसांत
भिजायच ठरवलं
ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त फिरवलं..
सप्टेंबर मध्ये मी तिच्या
घरी गेलो..
ऑक्टोंबर मध्ये दोघे
माथेरानला जाऊन आलो..
नोव्हेंबरला मला एकदम
स्ट्राईक झालं..
एवढ्या ह्या प्रवासात तिला
विचारायचच राहुन गेलं
म्हणुन ३१ डिसेंबरला
तिला पार्टीला नेलं..
धाडस करुन मी तिला
प्रपोज केलं त्यावर ती म्हणते कशी ,
" बारा महिने एकत्र फिरलो हे काय कमी झालं
अरे वेड्या, आता नविन बॉयफ्रेंड,नविन वर्ष
नाही का आलं ?"
.
.
मन हे नेहमी फुलपाखरा सारखं असावं एकिने
नाही म्हटलं तर काय झालं लगेच दुसरीवर
बसायला हवं !!

kas

सर्वात भारी जोक....

सर्वात भारी जोक....
.
पेशंट - विचित्र आजार झालाय..
जेवणानंतर भूक लागत नाही..
सकाळी उठल्यावर झोप लागत नाही..
काम केल्यावर थकवा येतो..
काय करू..??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
,
,
.
डॉक्टर - रोज रात्री उन्हात बसा

झंप्याची बायको

झंप्याची बायको रात्री कपडे काढत,
वाकड्या डोळ्यांनी हळूच झंप्या
कडे पाहते .. आणि लाडात म्हणते " माहित आहे
ना काय करायचं आहे ?"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या :
तुझ्या आईला तुझ्या एवढ्या रात्री मी कपडे
नाही धुणार ..!

सुरुवात

आकाशाला गवसणी घालणाऱ्या गरुडाला
पाण्याच्या एका थेंबा साठी खाली यावे लागते
खाली येणे म्हणजे त्याची हार नसते
तर ती एका उंच भरारीची सुरुवात असते.....!!!

अय्या खरचं.

मुली एकमेकाला भेटतात तेव्हा..
aye Hi, कशी आहेस?
आज या ड्रेस मधे छान दिसतेयस.
ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती, मला अजिबात नाही आवडत..
.
.
मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..
क्या बे कुत्ते, कमिने फोन करने को टाइम नही है क्या?
तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He is my Best Friend!!!!!!!
.
.
Moral: मुली तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे मन काळे असते.. तर मुलगे बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे असतात.
.
बरोबर मिञांनो ...

माझ्या राजाचा मावळा

एका मशिदीजवळ एक
पाणीपुरी वाला पाणीपुरी विकत
उभा होता चार काँलेज तरुणी पाणीपुरी खात
होत्या ....
मशिदीतून एक मुसलमान म्हतारा बाहेर आला.
रस्ता ओलांडायचा होता त्याला ......पण
गडबडीत
रिक्षा च्या आडून आलेला दुचाकीस्वार
लक्षात
आला नसावा...मोटारसायकलच्या धक्क्याने
म्हतारा कोलमडून पडला , मोटारसायकलच्याच
मागे
वीस बाविस वयाचा एक मुलगा सायकलवर येत
होता.....
सायकल वर पार्सल
ची पिशवी बहुधा डिलिव्हरी बाँय
असावा..अंगात जर्किन ..त्यावर
छातीच्या डावीकडे ..छत्रपतींचा देखणा ,
रुबाबदार
फोटो.
त्याने
त्या वृध्दाला पडताना पाहिले...आणि क्षणार्धात
त्याने पिशवीसहीत सायकल रोडवर सोडून
दिली..सायकल , पिशवी रोडवर पडली ...
धावत जाऊन त्याने त्या वृध्दाला उठवले ,
त्याचे कपडे
झटकले..त्याला रोड पार करुन दिला. मग परत
येऊन
पिशवी , सायकल उचलली व
आपल्या रस्त्याने निघून
गेला....
.
हे सर्व पाहून त्या चौघींपैकी एक जी बहुतेक
मराठा असावी...तीच्या तोंडून आपसूक बाहेर
पडलं...."हा खरा माझ्या राजांचा मावळा "....हे
ऐकून
तिघी हसल्या आणि एक म्हणाली ," लग्न
करशील
त्याच्याशी "
हे ऐकून पहिली मुलीने सुरेख उत्तर
दिलं...म्हणाली , "
का ? काय वाईट आहे...बापकमाईची
गाडी फिरवत
नाही..कष्ट करुन पोट
भरतो...माझ्या राजाचा मावळा आहे म्हणून
मुसलमान
वृध्दाला मदत केली इतकी माणुसकी..,
१४ फेब्रुवारी ला गुलाब हातात घेऊन
दरवर्षी नवीन
मुलगी शोधत फिरणार्
या माकडांपेक्षा असा मुलगा कधीही चांगलाच !!"
कौतुक वाटलं ....मुलीचं नाही तिच्या आईबाबांचे
ज्यांनी तिला हे पारखण्याची नजर दिली..
मित्रांनो आपण आपल्या गाडीवर ,
जर्किन्सवर
छत्रपतींचा फोटो घेतो पण
महाराजांना शोभणारे
वर्तन...., ते जमत नसेल तर महाराजांना गाडीवर
अंगावर मिरवू नका....
महाराजांची इज्जत कमी करु नका.

एक मुलगा आणि मुलगी

एक मुलगा आणि मुलगी यांचे
एकमेकावर खूप
प्रेम होते…. ...
पण त्या मुलीचा एका अपघातात
दुख:द मृत्यू होतो..
..
मुलाला ते सहन होत
नाही….तो तिच्या आठवणीत सतत रडत असतो…
तर रडत असताना काही २०-२५
परी तिच्याच वयातल्या त्याला
दिसतात…. त्यात ती पण असते…
त्या सर्व परी कडे एक एक
पेटलेली मेणबत्ती असते पण तिची मेणबत्ती पेटलेली नसते…
.. मुलगा त्याचे तिला कारण
विचारतो…..
तर ती सांगते..
..
.. ..
.. ..
..
आता पुरे कर रे,
किती रडतो आहेस…..
तुझ्या अश्रूमूळे ….मेणबत्ती सारखी वीझत
आहे...♥ ♥ ♥

लक्ष्मी

वेळात वेळ काढून नक्की वाचलेच पाहिजे खूप शिकायला मिळेल
माझ्या ऑफिस जवळ एक
मुलगी येऊन बसते. अंगावर शाळेतला गणवेश,
भाषा कन्नडी, अनवाणी पायाने चालणारी !
तिला विचारले मी , काय करतेस तू ?
ती म्हटली इयत्ता दुसरीत आहे .. झेड
पीच्या मराठी शाळेत ! मग म्हटल तू
डेली शाळा सूटल्यावर इथे काय करतेस ?
तर ती म्हणे ,
आई वडिलांची वाट पाहातेय् ! काय करतात आई
वडील ? मोठ मोठ्या बिल्डिंगा बनवतात !
तेव्हा मी ओळखले की हिचे आई वडील बिगारी आहेत
संध्याकाळी ते आई बाप आले तिला घेऊन गेले..
दुसरया दिवशी तोच सीन....बरेच दिवस
मी त्या मुलीशी बोलतेय....
तिच्या बोलण्यातुन एकच समजलय
मला ....की
तिच्या मते शाळा शिकल्यावर ....आपले
आई वडील जे बिल्डिंगा बांधतात ना ,
तश्या बांधाव्या नाही लागणार.....तर त्यात
राहणार्या मानसांसारखेच आपणही त्यात
रहायला जाऊ .....
ओह !!! केवढा दुर्दम्य आत्मविश्वास
आलाय शिक्षणाने त्या चिमुकलीच्या जीवनात !
वाह ! मान गये उसको !
तिच्याकडे शाळेत
पाणी न्यायला बाटली नव्हती म्हणून तिला एक
बाटली दिली ....एक चप्पल जोड दिला फार आनंद झाला तीला .
परवा ती मला रडताना दिसली... मी म्हटलं काय
झाले ग लक्ष्मी ?
तर ती म्हणे तुंम्ही दिलेली बाटली हरवली/
चोरीला गेली..... मी म्हटले अग मग त्यात रडायचं
कशाला ? दूसरी देते तुला ! ती थोड़ी सुखावली ...
तिला पुन्हा एक बाटली दिली.. तिने मुकाट्याने
घेतली अन पुस्तकांच्या पिशवीत घातली..
आज ती पुन्हा आली माझ्याकडे , आता म्हटले काय
झाले ? तर ती म्हणे काही नाही ,
बाटली द्यायला आलेय..!
मी म्हटले का ग ? काय झाले ? तर
ती म्हटली की माझी पहीली बाटली सापडली....
तेव्हा आई म्हनली ही देऊन टाक माघारी ...
मी म्हटले राहुदे ग... पहिली खराब झाली की येईल
तुला उपयोगाला !
पण तिला नाही समजले माझे बोलणे........
बाटली माघारी दिलीच तिनी...माझे डोळे नकळत
ओले झाले अन तिला एक वही दिली ,
ती पण नाही घेतली तिने......
मी म्हटले का ग ? तर
ती म्हटली ह्या वर्षाला लागणार्या वह्या आहेत
माझ्याकडे !!!!
ओह !!!
काय समज आणि काय संस्कार
आहेत !! ग्रेट वाह !!
असो ... धरण भरले की त्यातून पाणी सोडून
देतात...जनावरे पण एका वेळी हवं तेवढच खातात....
पण
शिकली सवरलेली माणसे मात्र
अधाश्यासारखी साठवत जातात...
किती टेम्पो नोटा कमावल्या म्हणजे आपण शांत अन
सुखी होणार आहोत ??
स्वता: ला बंधने घालणार आहोत की नाही ?
लक्षात ठेवा
माणसांपेक्षा मला ती लक्ष्मी अन तिचे अडाणी पण
संतुष्ट आई वडील खरे सुशिक्षित वाटतात,
सुखी वाटतात .
सलाम ! त्यांना मनापासून !!
                                                                                                          - वैष्णवी लोखंडे

एक ग्रेट लव्ह स्टोरी...: Marathi Love Story : Marathi Goshti

एकदा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ती तिच्या प्रियकराची वाट बघत बसली होती. खूप खुश होती ती.
आज तिला तिच्या प्रियकराकडून अंगठी मिळणार होती. ह्या स्वप्नात ती पूर्ण रंगून गेली होती.
तेव्हड्यात तिचा प्रियकर आला ...त्याला बघून तिला खूप आनंद झाला ...... त्याने तिला Birthday -wish केले , आणि वाढदिवसाची भेट म्हणून ... teddy bear दिला ........... teddy bear बघून ती नाराज झाली , कारण…………….. तिला अंगठी पाहिजे होती ..... ह्या रागात तिने तो teddy मागे फेकून दिला. .......... रस्त्यावार पडलेला teddy पाहून तिचा प्रियकर तो teddy उचलायला गेला आणि…………….. आणि तेव्हड्यात मागून येणार्या गाडीने त्याला उडविले ...आणि तो जागीच मरण पावला. हे पाहून तिच्या डोळ्यांतून मुसळधार पाउस पडू लागला .... आक्रोश करून ती रडू लागली . ......आणि तिने तो teddy घेऊन त्याला घट्ट मिठी मारली ....तेव्हड्यात त्या teddy मध्ये असलेल्या machine मधून आवाज आला कि, " प्रिये, अंगठी माझ्या (teddy च्या) खिशात आहे,

आठवणीतले प्रेम !

आपली ही गोष्ट दोन अशा व्यक्तींची आहे ज्यांनी आपले प्रेम कधीही व्यक्त केले नाही पण त्यांचे प्रेम अमर आहे हे जगाने मात्र मान्य केले. आपला नायक हा फक्त नावाने नायक आहे बाकी त्याच्या अंगी असा कोणताही गूण नाही कि ज्यामुळे त्याला नायक ही पदवी बहाल करता येईल. याउलट आपली नायिका ही अगदी एखाद्या हिंदी पिच्चर मधील हिरोईन दिसते तितकी किंवा त्याहूनही अजून सूंदर व सोजळ आहे. अशा या दोन अगदी उलट विश्ववृत्तांची भेट होते ती ऐका काॅलेज मध्ये जेथे हे दोघेही पदवी संपादन करत होते. एकाच क्लासमध्ये असून सूध्दा अजून नायक आणि नायिकेची भेट झाली न्हवति पण लवकरच हा क्षण येणार होता आणि अगदी तसेच झाले काही दिवसांनी नायकाला काॅलेजच्या आवारात एक आयकार्ड सापडले. नायकाला सापडलेले आयकार्ड हे योगा-योगाने नायिकेचेच होते. नायकाने ते आयकार्ड नायिकेला दिले आणि त्याच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला आणि मग काय जस एखादा भुंगा फूलाच्या मागे फिरतो तसा तो क्लासरूम , कॅनटिन व लायब्ररी जेथे त्याने परिक्षेच्या काळात देखील पाय टाकलेला नसतो अशा ठिकानी देखील तो तिचा अगदी सावली सारखा पाटलाग करत असतो. त्याला असा आपला पाटलाग करताना पाहून तिला देखील त्याच्या मनातील भावना जाणवलेली असते व तिची देखील काही अशीच भावना असते. पण दोघेही आपले प्रेम व्यक्त करायला घाबरत असतात. आपला नायक हा मूलींशी बोलण्याच्या बाबतीत थोडा घाबरट असतो आणि त्यामुळे तो एखाद्या टिपीकल मूलासारखा त्याचे प्रेम तिच्याजवळ व्यक्त करू शकत नव्हता. अखेर काॅलेजच्या शेवटच्या वर्षी त्याने ठरवले कि आपले प्रेम तिच्या समोर जाहीर करायचे व रोज साकाळी उठताना तो हाच निश्चय करतो की आज तरी मी माझे प्रेम तिच्या जवळ व्यक्त करीन पण तिच्यासमोर जाताच ती नाही बोलली तर मग काय या भितीने शब्द कधी त्याच्या तोंडातून बाहेर पडतच नाहीत.असे हे त्याचे अथक प्रयत्न चालू असताना अचानक एके दिवशी नायिका काॅलेज सोडून निघून गेली. नायकाने तिला सोधन्याचा खूप प्रयत्न केला पण आखेर त्याच्या हाती निराशाच लागली. पुढे तो त्याच्या करियर मध्ये व्यस्त झाला असला तरी तो त्याचे पहिले प्रेम कधी विसरू शकला नाही. तो तिची आठवण स्वतःच्या मनातून कधी पुसू शकला नाही. अशाप्रकारे तीन वर्षांचा काळखंड उलटला. पुढे त्याला काही कारणास्तव कोलकत्त्याला जायला लागले जेथे एक सेमिनार अटेंड करत असताना त्याची नजर एका मूलीकडे गेली व तिला पाहताच त्याच्या भूवया उंचावल्या आणि नकळतच तोंडावर एक स्मित हास्य उमटले कारण ती आणखी कोणी नसून आपली नायिकाच होती. तिने देखील त्याला पाहीले होते पण तरीही ती त्याच्याकडे दूर्लक्ष करत होती कारण तिला अस वाटत होत की तो तिला विसरला असेल. अखेर आपला नायक तिच्या जवळ जातो व तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती मात्र त्याला टाळतच असते कारण तिला त्या जून्या आठवणी पून्हा खणवून काढायच्या नसतात. आपला नायक आत्ता मूलींशी बोलायला तितका घाबरत नसल्यामूळे किंवा काॅरपोरेट सेक्टर मध्ये काम करताना शिकलेल्या निलाजरेपणा मूळे कि कास पण तो स्वतःच तिच्या जवळ जाऊन बसतो व तिला विचारतो "आेळखलेस का मला ? आपण दोघेही एकाच काॅलेमध्ये होते." अखेर ती देखील त्याच्या प्रश्नाला उत्तर देते " हो आठवल , तूम्ही तेच ना ज्यानी माझा हरवलेला आयकार्ड परत केला होता , तूम्हाला कशी विसरू शकते." हा होता त्याच्या दोघांतील  पहिला संवाद. पूढे दोघे काही वेळ एकमेकांशी असेच बोलत होते. नायकाने तिला अचानक मूंबई सोडण्याचे कारण विचारले असता तिच्या डोळ्यात पाणी आले. हे पाहून नायकाला आश्चर्य झाले व तो तिला म्हणाला जर तूला या आठवनींची त्रास होणार असेल तर तू मला नको सांगूस. त्यावर ती बोलते अस काही नाही मी सांगते तूला, "मी काॅलेजच्या लास्ट ईयर मध्ये असताना बाबांनी एका कार अॅक्सिडन्ट मध्ये त्यांचा प्राण गमावला व बाबांच्या शिवाय मला व आईला मूंबईसारख्या ठिकाणी सरवाईव करण कठीण होत होत म्हणून मी व आई कोलकत्त्याला शीफ्ट झालो. नायकाला हे एैकून खूप वाईट वाटले. पुढे त्याने तीच्या आईबद्दल विचारले तेव्हा त्याला कळले की तिची आईदेखील तिच्या वडिलांच्या दूखःमध्ये अचानक म्रूत्यू पावली व ती आता येथे एकटीच राहते. तिची ही परिस्थिती बघून नायकाला खूप वाईट वाटले व त्याने मनातल्या मनात तिची आयूष्यभर साथ देण्याचा निश्चय केला. खूप वेळ बोलल्यानंतर नायिकेने माझे काहीतरी अर्जंट काम आहे असे सांगून त्याचा निरोप घेतला पण जाता-जाता  ती तिची पर्स तेथेच विसरून गेली. नायकाला मात्र याचा खूप आनंद झाला होता कारण यामुळे त्याला पून्हा तिला भेटता येणार होते. त्याने ती पर्स उघडून बघितली असता त्याला त्यामध्ये तिचा पत्ता व काही पत्र सापडली त्यातील एक पत्र नायकाच्सा नावाचे होते जे नायिकेने काॅलेजमध्ये असताना त्याला लिहीले होते पण भीतीने त्याला कधी दिलेच नाही.नायकाने ते पत्र तसेच तिच्या पर्स मध्ये ठेवले व दूसर्या दिवशी तो तिच्या घरी ती पर्स देण्याच्या निमित्ताने गेला, नायिकेचे आपल्यावर प्रेम आहे हे नायकाला कलले होते पण त्याला ते तिच्या तोंडून ऐकायचे होते व म्हणून तो पुढे काही न काही कारण काढून तिच्या घरी येत राहायचा. नायिकेला मात्र नायकाचे आपल्यावर प्रेम आहे की नाही याबाबत क्षंका होती कारण त्याने कधीही त्याचे प्रेम तिच्या समोर जाहीर केले नव्हते. नायकाला कोलकत्त्यात येऊन दोन आठवडे झालेले असतात व त्याला आत्ता मूंबईला परत यायला लागणार होते पण अजूनही दोघांनीही त्यांचे प्रेम एकमेकांशी व्यक्त केले नव्हते. नायक मूंबईकड्ये जाण्यास निघाला आहे असे नायिकेला समजते व ती त्याला रोखण्यासाठी तो राहत असलेल्या हॉटेलकडे धाव घेते. तेथे तिला समजते की नायक आधीच एयरपोर्टकडे निघाला होता, हे ऐकून ती खूप निराश झाली पण तिला ही वेळ जाऊन द्यायची नव्हती व एक शेवटचा प्रयत्न म्हणून ती सूद्धा एयरपोर्टच्या दिशेने गेली. पण तिला खूप उशीर झाला होता कारण नायकाची फ्लाईट निघून गेली होती, हे पाहून तिला तिचे आश्रू अनावर झाले व ती रडू लागली. अखेर आपल्या मनाला समजूत घालून ती घरी परत निघाली. आपण आपले प्रेम व्यक्त करू शकलो नाही व यापूढे नायकाशी पून्हा कधीच भेट होणार नाही या विचाराने ती खूप दूःखी झाली होती.पण नियतीला काही वेगळेच अपेक्षीत होते कारण नायक हा एयरपोर्टच्या ऐवजी नायिकेच्या घरी गेला होता. नायकाला आपल्या घराजवळ पाहून नायिका भाउक झाली व त्याच्या दिशेने धावत जावूण त्याला घट्ट मिठी मारली. अखेर दोघांनी आपले प्रेम न सांगताच व्यक्त केले आणि यावरून प्रेमाला शब्दांची गरज नसते हे साध्य झाले. प्रेम हे तूम्हाला कोणत्याही रूपात मिळू शकते, तूम्हाला फक्त ते आेळखता आले पाहीजे.