
होतं.मुलगा एकदम साधा होता पण हुशार होता.लग्नानंतर ती त्याला कधीही स्वतःला हात लावु द्यायची नाही,आणि त्यानेही कधी तिच्यावर तश्या प्रकारची जबरदस्ती नाही केली.त्या एकमेकांचे संवाद फक्त जेवढ्यास तेवढेच असायचे.तु असं का करतेस असं एक शब्दानेही त्याने तिला कधीच विचारलं नाही.त्यांच नातं म्हणजे दोघांसाठी फक्त एक औपचारिकताच होती.कधी कधी तर ते बोलायचेच नाही.तो तिची खुप काळजी घ्यायचा,तिला कसलाही त्रास होऊ नये म्हणुन विचारपुस करायचा ती जेवढ्यास तेवढीच उत्तरे द्यायची.एक दिवस तो काही कामानिमित्त मुंबईला गेला होता.पण दोनच दिवसांनी त्याचा अॅक्सिडँट झाल्याची बातमी तिच्या कानावर आली,तिचे सासु सासरे व आईवडील तडख मुंबईला निघाले.जेव्हा त्यांनी त्याला पाहीले तेव्हा त्याचे आईवडील खुपरडले,कारण त्याचा शव पाहण्यासाठी काही उरलंच नव्हतं.त्याने घेतलेल्या काळजीपोटी का होईना तिच्या डोळ्यातही दोन थेँब पाणी आलं....काही वर्षे अशीच निघुन जातात...गौरीला तिच्या नवर्याची जरासुद्धा आठवण येत नाही....पण पार्थच्या त्या गोड गाण्यांची आठवण अजुनहि तिच्या मनात भरलेली आहे.ती तीच्या भुतकाळातच गुरफटुनबसलीय... कदाचित तिलाच त्यातुन बाहेर यायचं नाहीये....पन्ना स वर्षानंतर...... ..
तीचे सासु सासरे मध्यंतरी नियतीच्या नियमानुसार वय झाल्यामुळे देवाघरी निघुन गेले.ती आपल्या सुरकुत्या पडलेल्या हातांनी जेव्हा घराची सफाई करत असते...तेव्हा तिच्या नवर्याच्या वैयक्तिक कपाटाच्या तळाशी तिला काही कागदपत्रे सापडतात.ते पाहुन ती तर बेशुद्धच पडली...तिला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पीटलच्या बेडवर पडलेली होती तिला सलाईन लावण्यातआलं होतं.तिच्या शेजार्यांनी तिला तिथे आणलेलं असतं.त्या कागदपत्रातील एक कागद तिने तिच्या हातात तसाच घट्ट पकडलेला असतो.तो कागद दुसरं तिसरं काही नसुन पार्थला त्याचा शेवटच्या दिवशी रेडीओ ऑफिसमधुन मिळालेलं प्रमाणपत्र असतं.आणि त्यावर तिच्याच नवर्याचा black & white फोटो चिकटवलेला असतो.त्याकडे बघुन ती पुन्हा पुन्हा रडत असते.ज्याच्यावर आपण आयुष्यभर डोळे मिटुन प्रचंड प्रेम केले तो तिचा सख्खा नवरा होता.पण प्रत्यक्षात त्याला कधीही माझ्या प्रेमाचा वाटेकरी होऊ दिलं नाही... याचीच खंत तिला मरणापर्यँत राहील.....
मित्रांनो
माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे,प्रत्येकाचं प्रेमज्याच्या
त्याच्याजवळच असतं त्याला ओळखुन त्याच्यावरच प्रेम करा नाहीतर,आयुष्याच ्या
शेवटी हॉस्पीटलमधल्या पलंगावर पडलेले असताना तुम्ही,जगलेल्या आयुष्याची
जेव्हा गोळाबेरीज करत असाल,तेव्हाच तुम्हाला कळेल की सुख फक्त एका पावलावरच
होतं पण तेपाऊलही पुढे टाकण्याची हिँमत मी दाखवली नाही.आणि जन्मभर दुःखाला
कवटाळुन बसलो........... ...मित्रांनो या कथेतुन मला तुम्हाला काय
सांगायचंय ते काळजीपुर्वक समजुन घ्या.........कथालेखक अवि
No comments:
Post a Comment